Halloween Costume ideas 2015

स्त्रीचे खरे स्वरूप

जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात जागतिक स्तरावर साजरा केला जातो. या दिनाची खरी सुरूवात स्त्रियांविषयीच्या सामुहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 साली झाली. त्यावेळी तयार कपड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रिया व मुले यांना काम भरपूर पण मजूरी कमी असे प्रमाण होते. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये महिलांनी याविरूद्ध लढा पुकारला. जगाच्या इतिहासात स्त्रियांनी संघटित होवून स्वतःचे अधिकार मागण्यासाठी केलेला हा पहिला संघर्ष मानला जातो.
1908 साली विविध देशांमधील महिला प्रतिनिधीसह कार्यकर्ती्नलारा झेटगी हिने सुचविल्याप्रमाणे 8 मार्च या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता मिळाली. भारतात मुंबईमध्ये 8 मार्च 1943 ला पहिला महिला दिन साजरा करण्यात आला. 
सामान्यतः प्रत्येक समाजात स्त्रियांना हीन समजले जात असे. त्यांचा अपमान केला जात असे आणि तèहेतèहेच्या अत्याचारांचे त्यांना लक्ष्य बनविले जात असे. भारतीय समाजात, पतीचा मृत्यू झाल्यास पतीच्या प्रेताबरोबर पत्नीला सुद्धा जीवंत जाळले जात असे. चीन मधील स्त्रिच्या पायात आखूड लोखंडी बूट घातले जात असत. अरबस्तानात मुलींना जीवंत पुरले जात असे. 
इतिहास साक्षी आहे की या अत्याचाराविरूद्ध आवाज उठविणारे सुधारक अलिकडच्या युगात जन्मले आहेत. परंतु, या सर्व सुधारकांपूर्वी शेकडो वर्षे अरबस्तानात पैगंबर मुहम्मद सल्ल. हे स्त्रियांचे मोठे हितचिंतक असल्याचे दिसते व ते स्त्रियांवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराचा बिमोड करतात.  स्त्रीचा गौरव केला जातो हे खरे पण सत्य काही वेगळेच आहे. स्त्री जन्मा तुझी ही कहानी हृदयी अमृत नयनी पाणी. 
21 व्या शतकात आधुनिकतेचे वारे वाहत असताना आजही स्त्रियांचे हुंडाबळी जातात, लैंगिक छळ व अत्याचार केला जातो. त्यांना हीन वागणूक दिली जाते. लिंग तपासणी करून स्त्री जन्माला येण्याअगोदर कोवळा जीव गर्भात मारला जातो. तेव्हा वाटते कोवळी कळी खुडण्याचा अधिकार समाजाला दिला कुणी? 
अल्लाहचे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे या जगात जेव्हा आगमन झाले तेव्हा देखील मुलींना ओझे समजले जात होते. त्या लोकांना नेहमीच ही आशंका राहत असे की, योग्य स्थळ न मिळाल्यास त्यांना आपल्या मुली इतर टोळीमध्ये द्याव्या लागतील. ही देखील एक आशंका सदैव असे की, लुटारू त्यांना पकडून नेऊन दासी बनवून ठेवतील. या सर्व कारणांमुळे ज्या घरी मुलगी जन्माला येत असे, त्याचा चेहराच उतरून जात असे. (आणि आताच्या काळामध्ये सुद्धा काही प्रमाणात हीच परिस्थिती आहे).  ‘‘आणि त्यापैकी एखादयाला जेव्हा मुलीच्या जन्माची खुषखबर देण्यात येते. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काळीमा पसरते व तो तो र्नतासमान घोट गिळून बसतो. लोकांच्यपासून लपत-छपत फिरतो की या वाईट बातमीनंतर काय तोंड दाखवावयाचे, विचार करतो की  अपमानित होऊन मुलीला घेऊन रहावे अथवा मातीत पुरावे? पहा, कसे वाईट निर्णय आहेत. (कुरआन : सुरह 16ः 58,59)
स्वतःला प्रगत समजणारा वर्ग तर इतका निर्दयी आहे की, शिशुच्या जन्माची देखील वाट पहात नाही. गर्भावस्थेतच स्कॅनिंग करून मुलगा की मुलगी हे पाहिले जाते. मुलगी असेल तर गर्भपातच होतो. याचसाठी 1994 मध्ये एक कायदा बनविला गेला होता. छशींरश्र ऊळरसपेीींळल ढशलहपर्ळिींश ठशर्सीश्ररींळेप रपव झीर्शींशपींळेपेष चर्ळीीीश अलीं. या कायद्यान्वये गर्भलिंग निदान गुन्हा ठरविला गेला असून, देखील दरवर्षी 5 ते 8 लाख मुलींची गर्भामध्येच हत्या केली जाते. 
  इस्लाम भ्रूणहत्येला घोर अपराध ठरवितो व याला थोपविण्यासाठी विविध मार्ग चोखाळतो. ज्या-ज्या कारणांमुळे अथवा आशंकामुळे भ्रूणहत्या केली जाते, त्यांनाच इस्लाम दूर करतो. इस्लामनुसार मुलगी ही अहोभाग्य, शालिनता व कल्याणपद आहे. तिच्या पालनपोषणाची व उत्तम प्रशिक्षणाची शिकवण तो देतो. सामाजिक पातळीवर हे उत्तम प्रद सिद्ध झाले आहे.’’आणि जेव्हा जिवंत गाडल्या गेलेल्या मुीला विचारले जाईल ती कुठल्या अपराधापायी ठार केली गेली? (कुरआन 81ः 8,9)
देशातील कित्येक राज्यामध्ये मुलां-मुलींच्या जन्मदरात खूपच तफावत आहे. विशेषतः गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली व हिमाचल प्रदेशमध्ये. या राज्यांमध्ये 1000 मुलामागे 800 मुली आहेत. 1991 च्या जनगणनेनुसार पंजाबमध्ये 1000 मुलांमागे 875 मुली होत्या आणि 2009 मध्ये ती तफावत 793 वर पोहोचली. ज्या समाजामध्ये इतके मुलींचे अधिकार नाकारले जातात अथवा त्यांना कनिष्ठ समजले जाते त्या ठिकाणी मुलींची स्थिती सुधारण्यासाठी व त्यांना वर उचलण्याकरिता या शिकवणीची गरज आहे. तरीही आज भारतीय स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगती पथावर आहे. 
शेतातील मजुरापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत तिची यशस्वी घौडदौड चालू आहे. ती शिक्षिका, डॉ्नटर, ग्रामसेविका, सरपंच, तलाठी, जिल्हाधिकारी पोलीस निरीक्षक, पायलट, ड्रायव्हर, खेळाडू अशा एक ना अनेक क्षेत्रात आपली यशस्वी भूमिका बजावत आहे. सलाम या नारी श्नतीला.  जगाने स्त्रीला अबला असे गोंडस नाव दिले आहे. ती अबला नसून सबला आहे. महिला आज खरच स्वतंत्र सक्षम झाली आहे का? हा प्रश्न समाजाला अंतर्मुख होण्यास भाग पाडतो हे ही तितकेच खरे आहे. 
कालामानाप्रमाणे मुली शाळा, कॉलेजात, शिकत आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले आहेत. त्या स्वतःची ओळख निर्माण करीत आहेत.आजची स्त्री आता पेटून उठली आहे. तिला तिच्या हक्काची जाणीव झाली आहे. खरंच ती स्वतंत्र आहे? असा प्रश्न पडतोच.  बालिकेपासून ते वृद्धेवर ही अत्याचार होताना दिसतात. गर्दीत, समाजात, शाळेत, नातेवाईकात आज एकटी स्त्री असेल तर ती खरोखरच सुरक्षित आहे का? तर नाही हेच उत्तर येईल. ही परिस्थिती खेड्या, पाड्यापासून मोठ्या शहरापर्यंत एकच आहे. मला वाटते महिलांपुढे अनेक आव्हाने आहेत सर्वात जास्त आहे ते म्हणजे तिची सुरक्षितता, तिचे आरोग्य आणि घरगुती हक्क.
निरोगी, हसतमुख आणि शांत स्त्री घराचे वैभव असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. स्त्रियांनी स्वतः आत्मपरिक्षण करून स्वतःमधील न्युनतेची भावना कमी करावी, अंग प्रदर्शन न करता आपल्या क्षेत्रात कष्टाने जिद्दीने उत्तूंग गरूड झेप घ्यावी, शिक्षणाची कास सोडू नये स्वतःचे आरोग्य जपावे. पुढची पिढी सुसंस्कारित घडावी म्हणून प्रत्येक आईने मुलीच्या मागे खंबीरपणे उभे रहावे. हुंडाविरोधात, स्त्री भ्रुणहत्या विरोधात मोठे पाऊल उचलावे, नवीन काहीतरी निर्माण करावे, एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीची मैत्रीण व्हावे, मनाशी खरे रहावे. 
दर्या की कसम मौजों की कसम ये ताना, बाना बदलेगा, तु खुद को बदल के देख जरा तब ही जमाना बदलेगा
इस्लामने स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व मानले आहे. तिच्या हक्काचा व अधिकाराचा विचार फक्त एका दिवसापुरता किंवा एका वर्षापूरता केलेला नसून तिच्या संपूर्ण जीवनालाच इस्लामने सुरक्षित केले आहे. एक मुलगी म्हणून तिची जबाबदारी पित्यावर सोपवण्यात आली आहे. बहिण असेल तर भावावर, व बायको म्हणून नवऱ्यावर व एक आई म्हणून तिच्या मुलांवर पूर्णपणे जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि जो ही जबाबदारी पूर्ण करणार नाही त्याला अत्यंत वाईट शिक्षेची पूर्वसूचना कुरआनमध्ये देण्यात आली आहे. कुरआनचा अभ्यास केल्यास असे दिसते की स्त्रीयांना त्यांचे जीवन स्वतंत्रपणे व सुरक्षितपणे जगता यावे, याचाच जास्त विचार केला गेला आहे. तीला सर्व अधिकार देण्यात आले आहे. आजचा समाज स्त्री भ्रुणहत्या या समस्येने ग्रस्त आहे पण इस्लामने भ्रुणहत्येला फार मोठे पाप ठरवले आहे. स्त्री-भ्रुणहत्या करणे हा फार मोठा गुन्हा असून त्यासाठी परलोकात तुम्हाला जाब द्यावा लागेल, अशी सूचनाही कुरआनमध्ये करण्यात आली आहे. मुलगी जन्माला आली तर माणसाला खुशखबरी देण्यात आली आहे, की त्याने जर आपल्या मुलीचे समानतेने पालनपोषण केले तर त्याला त्याचा चांगला मोबदला दिला जाईल.  या सर्व बाबी पाहता असे दिसते की स्त्री-पुरूष समानतेचा पुरस्कर्ता स्त्री-जन्माला व तिच्या सुरक्षित व स्वतंत्र जीवनाला व हक्काची समाजाला जाणीव करून देणारा एक सत्यमार्ग व एक परिपूर्ण अशी जीवनपद्धती म्हणजे इस्लाम होय.


- सय्यदा यास्मीन आरा
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget