Halloween Costume ideas 2015

पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आदर्श जीवनचरित्र

-एम. हुसैन गुरुजी
पैगंबर मुहम्मद (स.) इ. सन ५७१ मध्ये अरबस्तानातील मक्का   नगरीत जन्मले. त्यांच्या जन्मनाच्या काही वर्षांपूर्वी त्यांचे पिता अब्दुल्ला यांचे निधन झाले होते. जन्माच्या सहा वर्षांनंतर माता आमिनासुद्धा निवर्तल्या. अशा प्रकारे ते बालपणातच अनाथ झाले. त्यांचे संगोपन आजोबा अब्दुल मुत्तलीब यांनी केले. त्यांच्या देहावसानापश्चात त्यांचे काका अबू तालीब यांनी त्यांचे पालनपोषण केले.
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शुभागमनाच्या भविष्यवाणी अनेक धार्मिक ग्रंथांत स्पष्टपणे आढळून येतात. त्यात वेद, पुराण, तौरेत, बायबल आणि बुद्ध लिखित ग्रंथाची पृष्ठे आदींचा समावेश आहे. जरी या ग्रंथाची पुरेपूर सुरक्षितता होऊ शकलेली नाही. यामध्ये पुष्कळ सारे परिवर्तन स्वत: या ग्रंथांच्या अनुयायांनी केले. परंतु याच्याव्यतिरिक्त पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शुभागमनाची भविष्यवाणी व लक्षणे अंकीत आहेत. या सगळ्या गोष्टी शंभर टक्के केवळ आणि केवळ पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी निगडीत विश्वासपात्र आहेत.
वेदांमध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांना नराशंस, पुराणात कल्की अवतार, बायबलमध्ये फारक्लीत आणि बौद्ध ग्रंथात अंतिम बुद्ध म्हटले गेले आहे. त्यांची दुसरी विशेषता ही आहे की इतिहासाच्या संपूर्ण उजेडात ते आले आहेत. अर्थात त्यांच्या जन्मापासून बालपण, तारुण्य, प्रेषित्वाच्या पदावर नियुक्ती आणि पैगंबर बनविल्यानंतर तेवीस वर्षांच्या प्रेषित्वाच्या जीवनाचा सर्व तपशील (यात इ. सन ६३४ मध्ये झालेल्या मृत्यूपर्यंत) प्रमाणित माध्यमातून अभिलेख करण्यात आलेला आहे. आज सुमारे साडे चौदाशे वर्षे झालेली आहेत. परंतु त्यांच्या २४ तासांच्या दैनंदिन जीवनाची उपक्रमशीलता सुरक्षित आहेत.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्पष्टपणे फरमाविले की ‘‘मी कोणताही नवा संदेश आणि नवा धर्म घेऊन आलेलो नाही.’’ किंबहुना अल्लाहच्या मागील पैगंबर व प्रेषितांनी जो संदेश व शिकवणी ईश्वराकडून सादर केल्या होत्या, त्याच त्यांनी समस्त मानवांसमोर सादर केलेल्या आहेत. अशा तऱ्हेने ते इस्लामचे संस्थापकदेखील नाहीत. कारण इस्लाम ईश्वराकडून आहे. यावरून हे स्पष्ट होते की मुहम्मद (स.) अल्लाहचे अवतार नव्हते किंबहुना मानव अल्लाहचे दास आणि त्याचे पैगंबर आहेत.
बालपण व तारुण्य
पैगंबर मुहम्मद (स.) यांचे बालपण त्याकाळातील सर्व प्रकारच्या अनिष्टतेपासून अगदी विशुद्ध व निर्मल होते. ते बाल्यावस्थेतच अनाथ झाले होते. ते नेहमी सत्य बोलत असत. कधी खोटे बोलले नाहीत. त्यांच्या स्वभावात लज्जा व संकोच ठासून भरलेला होता. पावित्र्य व निर्मलता त्यांना अत्यंत प्रिय होती. त्यांचे व्यवहार असे खरे होते की ज्या लोकांनीसुद्धा त्यांच्यासोबत व्यापार व प्रवास केला, त्यांनी सदैव त्यांची स्तुतीच वर्णन केली. कोणी क्षूद्र श्रेणीची तक्रारदेखील केली नाही. त्यांचे जीवन अतिशय साधे, सरळ आणि स्वाभिमानी होते. एखादा मानव याची कल्पनासुद्धा करू शकत नाही. त्यांचे निवासस्थान, पोषाख, राहणीमान, खाण्यापिण्याचा सर्व तपशील पुस्तकांमध्ये आलेला आहे.
त्यांच्या अंतरंगात स्वत:च्या जातीसाठी बदला घेण्याची भावना आढळून येत नसे. ते खूप क्षमा करणारे होते. कधी एखाद्या गुलाम, सेविका, बालके किंवा स्त्रीला त्यांनी मारले नाही. ते निर्बल, गुलाम व अनाथ बालकांवर खूप प्रेम करीत असत. ते सदैव पशुपक्ष्यांवर दया व वात्सल्याने वर्तन करीत आणि दुसऱ्यांनादेखील यासाठी खूप आग्रह करीत असत. ते वचनाचे दृढनिश्चयी, खूप पाहुणचार, आदरातिथ्य आणि शेजाऱ्यांशी सद्वर्तन करीत असत. दासांच्या अधिकारांचा खूप अधिक विचार ठेवत असत. अरब समाजात मूर्तिपूजा आम होती. त्याच्याशिवाय मोठमोठ्या अनिष्ठता सामान्यपणे आढळून येतसोत्या. परंतु लोक यांना दूषित समजत नसत. उदा. मदिरा, जुगार, व्यभिचार, निर्लज्जता, खून, लूटमार, विनाशकारी कार्ये आणि बालिकांना जिवंत दफन करणे इत्यादी या सगळ्या वाईटपणापासून ते नेहमी अलिप्त व शुद्ध राहिले.
त्यांनी व्यापार केला आणि स्वत:च्या प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठेच्या आधारावर खूप यशस्वी ठरले. पंचवीस वर्षांच्या वयात हजरत खदीजा (रजि.) नामक महिलेसोबत विवाह केला. त्या दोनदा विधवा झालेल्याहोत्या. निकाहच्या वेळी त्यांचे वय चाळीस वर्षे होते. यांच्यापासून त्यांना काही अपत्येसुद्धा झाली. ज्यांत तीन सुपुत्र व चार सुकन्यांचा समावेश होता. तिन्ही सुपुत्र बालपणातच वारले. ते चाळीस वर्षांच्या वयात प्रविष्ठ झाले. तेव्हा मक्केत सत्यवान व विश्वस्त म्हणून प्रसिद्ध झाले होते. गरीब, विधवा, अनाथ, वाटसरू यांच्यासोबत ते शुद्ध हृदयता व प्रेमाची वागणूक करीत आणि त्यांच्या गरजांची सदैव परिपूर्तता करीत असत.
त्यांना अशांती, उपद्रव, जुलूम आणि अत्याचाराचा खूप तिटकारा होता. विवेक सांभाळताच त्यांनी सामाजिक व लौकिक जीवनास जवळून पाहिले. आपल्या जातीतील विकृती व बिघाडास पाहून ते फार दु:खी व शोकाकुल झाले. काबागृह एक ईश्वराच्या उपासनेचे घर आणि भक्तीसाठी बनविले गेले होते. परंतु लोकांनी यात ३६० मूर्ती आणून ठेवल्या होत्या. अरबमध्ये कबिले व टोळ्यांचे जीवन सर्वत्र आढळून येत असे. प्रत्येक जातीचे दैवत भिन्न भिन्न होते. विवाहपश्चात ते मक्केपासून काही अंतरावर एका पर्वतावर हिरा नामक गुफेत विराजमान होऊन एकांतमध्ये विचार चिंतन करीत असत. त्यांच्या समाजात काही मोठ्या मानवी सुशीलतादेखील आढळून येत होत्या. परंतु यामध्ये उल्लेखित घातक बिघाड उत्पन्न झाले होते. संपूर्ण समनाजात जुलूम, अत्याचार व अशांतता आम होती. बलवान निर्बलास दाबून ठेवित असे. न्यायनिवाडा समाप्त झाला होता.
अशा अवस्थेत ईश्वराकडून जिब्रिल नावाचे ईशदूत आले आणि मुहम्मद (स.) यांना दर्शविले की तुम्हाला अल्लाहने पैगंबर बनविले आहे. आपण केवळ अरब देशच नव्हे किंबहुना जगाच्या सकल मानवांचे प्रेषित बनविले गेले आहात.
या भारदस्त व कठीण उत्तरदायित्वाच्या अकस्मात ओझ्यामुळे स्वाभाविकपणे ते भयग्रस्त झाले. घरी परतले. धर्मपत्नी खदीजा (रजि.) यांना संपूर्ण वृत्तान्त कथन केला. तिने सांत्वना दिली की अल्लाह तुम्हाला व्यर्थ घालविणार नाही. आपण सदैव सत्य बोलता.
आप्तस्वकीयांसोबत सद्वर्तन करता. भुकेल्यांना जेऊ घालता. पाहुणचार करता. गरीब व असहाय लोकांची मदत करता. पत्नी आपल्या पतीची दुसऱ्यांच्या तुलनेत सर्वाधिक रहस्य जाणणारी असते. खदीजा (रजि.) यांची ही साक्ष मुहम्मद (स.) यांच्या सत्यतेचा फार मोठा पुरावा होय.
हिरा गुफेतून मक्का येथे परतल्यावर ते पुन:श्च एकांतात गेले नाहीत. येथे कोणी हा गैरसमज करून घेऊ नये की मुहम्मद (स.) पैगंबर बनण्याची तयारी करती होते. वास्तविक प्रेषित्व व पैगंबरी ही श्रम व पराकाष्ठा करून प्राप्त करण्याची वस्तू नाही. अल्लाह आपल्या दासांपैकी एखाद्या विशेष दासाला स्वत: निर्वाचित करून पैगंबर बनवित असतो. त्याच्याद्वारे मानवाचे मार्गदर्शन व पथप्रदर्शनाचा मार्ग लाभत असतो. त्याचे व्यावहारिक जीवन लोकांना अल्लाहच्या मर्जीनुसार वाटचाल करण्याचा मार्ग प्रशस्त करीत असतो. अशा प्रकारे मुहम्मद (स.) प्रेषित्व परंपरेतील अंतिम प्रेषित आहेत. हा गैरसमज व्हावयास नको की ते केवळ समाजसुधारक होते. अशा तऱ्हेने त्यांची स्थिती एखाद्या संत किंवा पीरासारखी नव्हती. ते खरे तर अल्लाहचे पैगंबर होते. या भानाने अल्लाहच्या दासांपर्यंत संदेश पोहचविण्याचे कार्य ईश्वराची आज्ञा व पथप्रदर्शनानुसार पार पडत असते. केवळ २३ वर्षांच्या संक्षिप्त जीवनकाळात त्यांनी आपल्या प्रेषित्वाच्या अंतर्दृष्टी व नेतृत्वाद्वारे संपूर्ण अरब देशात एक समग्र क्रांती प्रस्थापित केली आणि उत्कृष्ट मानवांचे एक मोठे संघटन तयार केले.
आवाहनाचा प्रारंभ
पैगंबर नियुक्त केल्यानंतरक त्यांनी मक्केत त्या काळातील प्रथेनुसार सफाच्या पर्वतावर चढून लोकांना एकत्र होण्यासाठी साद घातली. लोक मोठ्या प्रमाणावर जमले. प्रथम त्यांनी लोकांना पृच्छा केली, त्याच्याविषयी ते काय मत बाळगतात? लोक उत्तरले, आपण नेहमी सत्यवान व विश्वस्त मनुष्य राहिला आहात! आपण कधी असत्य बपोलला नाही. याच्या पश्चात त्यांनी फरमावले, जर मी सांगेन की एक सैन्य निकट तुमच्यावर हल्ला करणार आहे, तर तुम्ही मान्य कराल काय? लोकांनी प्रत्युत्तर दिले, ‘होय, मान्य करू!’ यांच्यानंतर त्यांनी आपले आवाहन सादर केले.
इथे समग्र विचार केल्यावर लक्षात येते की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी प्रथमच आपले आवाहन आणि संदेश समस्त लोकांसाठी सादर केले. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट ही ज्ञात होते की त्यांनी अरब समाजात आढळणाऱ्या अनिष्ठतेच्या समाप्तीकरिता समाजसुधारणेसाठी वेगवेगळ्या चळवळी आरंभिल्या नाहीत. किंबहुना रबच्या बंदगीचे एकच आवाहन सादर केले.
आवाहनाचा विरोध
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी लोकांना आवाहन केले की एक अल्लाहची उपासना करा आणि एखाद दुसऱ्यास त्याच्यासोबत सहभागी कदापि करू नका. लोकांच्या विचारानुसार प्रस्तुत आवाहन त्यांच्या वाडवडिलांच्या धार्मिक कल्पनांच्या विरूद्ध होते. या आवाहनास मूठभर लोकांनी प्रतिसाद देऊन स्वीकार करून घेतले. परंतु बहुसंख्येने त्याचा कडाडून विरोध केला. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्वत: संयम पाळला आणि त्याच्या अनुयायांना सुद्धा अद्भूत सहनशीलतेचा उपदेश केला. परंतु विरोधात उग्रस्वरूप उत्पन्न होत गेले. त्यांच्या साथीदारांना अग्नीवर निजवले गेले, चाबकाने मारणयात आले.विविध पद्धतींनी त्यांना जुलूम व अत्याचाराचा बळी ठरविले गेले.आरोप अन् खोट्या प्रचाराचे रान उठविले गेले. येथपर्यंत की एका पर्वताच्या खोऱ्यात तीन वर्षांपर्यंत त्यांच्या सोबत्यांना व परिवारजनासह सगळ्यांवर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला.
पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या सोबत्यांना एका खोऱ्यात कैद करण्यात आले.निष्पाप बालके मातांच्या छातींमध्ये दूध नसल्यामुळे धाय मोकलून रडत होती. परंतु निर्दय व कठोर अंत:करणाचे विरोधक खोऱ्याच्या किनाऱ्यास उभे राहून जोरजोरात हसत होते. त्यांना थोडीसुद्धा दया येत नव्हती. तीन वर्षांनंतर काही मानवी सहानुभूती बाळगणाऱ्या लोकांच्या मध्यस्थी व प्रयत्नाने या खोऱ्यातून त्यांची सुटका झाली. परंतु मक्केत विरोध कमी होत नव्हता. किंबहुना यामध्ये दिवसागणिक तीव्रतेत वाढ होत होती.
(पूर्वार्ध)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget